परमपूज्य आईंच्या सूचना
१. परमार्थ निकेतनाचा आमचा मुख्य उद्देश हा की, त्या ठिकाणी बंधु–भगिनीकडून नियमित प्रार्थना घडावी आणि संसाराच्या उद्वेगाने तापलेले मन शांत होऊन सर्वांचे जीवन सुखमय व्हावे. आठवड्यातून एकदा रविवारी सकाळी बाळगोपाळांसाठी बालोपासनेचा पाठ देण्यात यावा. तेणेकरून त्यांना आतापासूनच योग्य वळण लागण्यास मदत होईल.
२. प्रार्थनेला येते वेळी रोज तांदूळ, पैसा, नारळ, फळे असले काहीच कोणी आणू नये. भजनाच्या शेवटी आरती लावली जावू नये. का ? तर रूढीप्रमाणे कोणी ताटात पैसे टाकतात. उत्सवसमयी आरती लावण्यास हरकत नाही. पण त्यात कोणी पैसे टाकू नये.
३. आपले भजन कुठे देवळात चालते तर कुठे घरी चालते तरी वरील नियम तेथेही लागू केला पाहिजे. पूजा, नैवेद्य, आरती हे सर्व मनाच्याद्वारेच घडले पाहिजे. अर्थात लोकांना दिसण्याची जरूरी नाही.
४. तुम्ही म्हणाल देवाच्या दर्शनाला जाताना रिक्त हस्ताने जाऊ नये तेव्हा कसे करावे ? पण संतांच्या दृष्टीने हा मार्ग चुकीचा आहे. कारण देव म्हणजे त्रिभुवनाला पोसणारा आहे. तेव्हा आम्ही त्याला काय देणार ? संसारात तापलेले मन शांत करण्याकरिता सावली म्हणजे देऊळ आणि त्याठिकाणी मन रमावे म्हणून मूर्ती ठेवावयाची. ती पडेल धक्का लागेल किंवा कोणी नेतील म्हणून स्थापना करावयाची त्या मूर्तीचे रोजच्यारोज कौतुक केले जावे म्हणून पुजारी ठेवावयाचा आणि पुजार्याचे पोट भरण्यासाठी देवळात जाणार्यांनी मूठभर तांदूळ आणि पैसा न्यावयाचा हा मार्ग काढण्यात आला आहे. आमच्याकडे मूर्ती नाही. पुजारी नाही. ज्यांना रूढीचे पालन करावयाचे आहे त्यांना गांवात देवळे आहेत.
५. संसारातील तक्रारी सांगण्याची कोणी घाई करू नये सांगितल्याप्रमाणे नेम म्हणजे श्रीहरिमंदिरातील प्रकाशने एकामागून एक रोज नियमित वाचनात ठेवणे, जप करणे आणि भजन व नित्योपासनेचा नेम चालविणे. ज्यांना मंदिरात येण्यास सवड नसेल त्यांनी घरात का होईना नेम चालवावा.
६. आमचा मार्ग पैसा मिळवावयाचा नसून हरिप्रेम मिळवावयाचा आहे. याकरीता देवाला खूष करणे जरूर आहे. देव भक्तिने खूष होतो. संतांनी कर म्हटलेले करावयाचे आणि नको म्हटलेले सोडायचे हे भक्तिचे मुख्य वर्म असल्याने ही गोष्ट सर्वांनी सदैव लक्षात ठेवली पाहिजे.
- ।। ॐ नम: शिवाय ।।
- आई