श्रीहरिमंदिरातील प्रकाशने
परमपूज्य आईलिखित
बालोपासना [कानडी व इंग्रजी मध्येही उपलब्ध ]: एकदा आईंच्या दर्शनार्थ गांवची परगांवची पुष्कळशी मंडळी जमली असता त्यातील काही बंधू-भगिनींनी आईंना विचारले, माझा मुलगा अभ्यास करीत नाही, फार दांडगाई करतो, संध्या करीत नाही, देवाला नमस्कार करायला सांगितलं की तेही ऐकत नाही. उलट उत्तर देतो. तेव्हा यावर उपाय काय? तेव्हा आईंनी खास बाळगोपाळांसाठी “बालोपासना” नांवाचे प्रार्थनेचे छोटेसे पुस्तक छापले व येणार्या प्रत्येक भगिनींना देऊन मुलांची अंघोळ झाल्यावर मुलांकडून म्हणून घेण्यास सांगितले. त्यामुळे दिवसेंदिवस मुलांच्या स्वभावात बदल होत असल्याचा सर्वांना अनुभव आला. लहान मुलांकडून नियमित प्रार्थना घडावी व त्यांचे भावी जीवन सुखमय व्हावे या उद्देशाने माताजींनी हे पुस्तक लिहिलेले असून त्यामध्ये गणेशस्तुती, हरिस्तुती, नारायणाष्टक, चोवीस नामावळी, गुरुपादुकाष्टक, यदुवीराष्टक, मानसपूजा, कृष्णाची आरती व विज्ञापना हे भाग आहेत.
नित्योपासना : एकदा काही मंडळींनी आईंना प्रश्न केला की, आम्ही उभयता नोकरीला जाणारे असल्याने आम्हाला भजनाला येण्यास सवड मिळत नाही, तेव्हा आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. तेव्हा आईंनी नित्योपासना नामक एक छोटेसे पुस्तक छापले व नोकरीला जाता येता, बस किंवा रेल्वेत वाचण्याचे करा असे सांगितले. त्या नेमापासून सर्वांना ऑफीसला जाण्यायेण्याची दगदग जाणवेनाशी झाली तसेच घरात शांती नांदू लागली. यात माताजींच्यावर सद्गुरुंचा जो अनुग्रह झाला त्याचे उत्स्फूर्त वर्णन आहे. त्याचप्रमाणे बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध या अवस्थेचे अनुभवसिद्ध वर्णन व नवविधा भक्तिचे सुलभ विवेचन तसेच सगुण निर्गुण भक्तिचे सुरम्य वर्णन केले आहे.
नित्योपासनाक्रम : या भागात सोमवार ते रविवार, सकाळी व संध्याकाळी म्हणावयाच्या भजनाचा पाठ आहे.
परमार्थमार्गप्रदिप भाग १ व २ [परमार्थमार्गप्रदीप भाग १ कानडी मध्ये ही उपलब्ध ] : परमेश्वराचे ठिकाणी चित्तवृत्ति स्थिर होण्यास भजनासारखे सोपे साधन दुसरे नाही. भजनाने दिवसेंदिवस श्रध्दा दृढ होत जाते व मन हरिस्मरणात रमू लागते. त्यानंतर संसाराची झळ कमी कमी होत जाऊन मन प्रसन्न बनते. असे आईंचे स्वानुभवाचे सांगणे आहे. बारा वर्षाच्या प्रवासात संग्रहित केलेली संतांची पदे व अभंग एकत्र करून भजनाचे पुस्तक तयार करून त्यात आखल्याप्रमाणे बाळगोपाळ व बंधू -भगिनींना भजनाचा पाठ दिला. या पुस्तकाचे नित्योपासनाक्रम व श्रीहरिप्रेमलहरी असे दोन भाग आहेत. या सर्व भजनांना स्वत: आईंनी अतिशय सुंदर वेगवेगळ्या चाली लावलेल्या आहेत. या त्यांच्या शिकवणूकीप्रमाणे आज सर्वत्र नियमित प्रार्थना चालू आहे.
श्रीहरिप्रेमलहरी : या भागात विजयादशमी, महाशिवरात्र, गणेशाराधना, रामनवमी, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्णजन्म, चातुर्मासातील ९ एकादशी व नित्याची एकादशी, सिद्धारूढ स्वामी पुण्यतिथी, तुळशी विवाह, दत्तजयंती या उत्सवात म्हणावयाच्या भजनाचा पाठ आहे.
परमार्थमार्गदर्शन : प्रत्येक मानवाकडून रोज काही वेळ नियमित देवाची प्रार्थना, संतचरित्रे व संतांच्या बोधाचे वाचन घडावे. तेणेकरुन खात्रीने त्यांचे जिवन सुखमय होईल, हे माताजींचे स्वानुभवाचे सांगणे आहे. हा उद्देश समोर ठेवून संतांची चरित्रे व बोधपर गोष्टी एकत्र करुन पाच भागांचे परमार्थमार्गदर्शन या नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते पाच भाग वेगवेगळे असून त्यांची नांवे अनुक्रमे गोपाळकाला, सत्त्वशील राजे, संतमेळा, सुबोधभानू व त्रिवेणीसंगम अशी आहेत.
भाग १ – गोपाळकाला [कानडी मध्ये ही उपलब्ध ]: भगवान श्रीकृष्ण गोकुळात असताना गोपाळांसह रोज गायी चारावयाला यमुनेतीरी जात असे. दुपारी जेवायला बसतेवेळी कधी कधी गोपाळांच्या आग्रहास्तव सर्वांच्या शिदोर्या पुढ्यात घेऊन सर्व पदार्थ एकत्र करुन (गोपाळकाला) गोपाळांना देई व आपण पण सेवन करी. त्याप्रमाणे या पुस्तकात हरिभक्तीच्या, गुरुभक्तीच्या, युक्तीच्या, शक्तीच्या, विरक्तीच्या, मूर्खपणाच्या, शहाणपणाच्या, चतुरपणाच्या, हजरजबाबीपणाच्या, विनोदीपणाच्या, रागाच्या, लोभाच्या, नीतीच्या, रीतीच्या इत्यादी छोट्या मोठ्या बोधपर गोष्टींचे मिश्रण आहे.
भाग २ – सत्त्वशील राजे : यात अंबरीष, चंद्रहास, गोपीचंद, भर्तृहरी, नल, ध्रुव, भद्रायू, शिबी, श्रियाळादी राजांच्या गोष्टी आहेत.
भाग ३ – संतमेळा : यात महाराष्ट्रातील पुंडलीक, ज्ञानेश्वर, रामदास, तुकारामादी संत; कर्नाटकातील पुरंदरदास, कनकदास, चिदंबर दीक्षित, सिद्धारूढ महाराज इत्यादी संत; मद्रासकडचे मारणनेर; बंगालकडचे लोचनदास; काश्मीरचे परमानंदजी; उत्तर हिंदुस्थानातील चैतन्यमहाप्रभु, कबीरदास, तुलसीदासादी संतांची थोडक्यात माहिती दिली आहे.
भाग ४ – सुबोधभानु : यात श्रीमत् शंकराचार्य, श्रीबसवेश्वर, वर्धमान महावीर, गुरु नानक, हजरत महम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, झरतुष्ट्र, गौतमबुद्ध यांची संक्षिप्त जीवनचरित्रे व याज्ञवल्क्यांचे सामर्थ्य, अष्टावक्र मुनींचा बोध, जडभरत – रहुगण राजा आणि यदु – अवधूत यांचा संवाद आहे.
भाग ५ – त्रिवेणीसंगम : यात सुकन्या, सुमती, सावित्री, रेणुकादेवी, वृंदादेवी, कात्यायनी, अनसुयादी पतिव्रता स्त्रिया; मीराबाई, हेमरेड्डी मल्लम्मा, जनाबाई, सखुबाई, कर्माबाई, अक्कमहादेवी इत्यादी परमभक्त स्त्रिया व मदालसा, हेमलेखा, चुडाला इत्यादी ज्ञानी स्त्रियांची चरित्रे आहेत.
कथासुमनहार : यामध्ये रामायण व महाभारतातील गोष्टींनी गुंफलेला सुमनहार आहे. याचप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांनी मनुष्याने जीवनात कसे वागावे व आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे याबद्दल श्रीकृष्ण शिष्टाई या भागात सुंदर वर्णन केलेले आहे.
रामायणात वाल्मीकऋषी, दिलीपराजा, रघुराजा, रामजन्म, रामास गुरुपदेश, यज्ञरक्षण, अहिल्योध्दार, सीतास्वयंवर, वनवास, मंदोदरी, मारुतीची भक्ती, युक्ती, शक्ती, विरक्ती यांच्या निवडक गोष्टी दिल्या आहेत.
महाभारतात भीमसेनाची दांडगाई, लाक्षागृह, बकासूरवध, द्रौपदी स्वयंवर, द्रौपदीला शिवाचा वर, पुण्याईचे जांभूळ, भीमभक्ती, अर्जुनास भक्तिचा गर्व, संन्याशी अर्जुन, मयसभा, जरासंध वध, राजसूय यज्ञ, द्रौपदी वस्त्रहरण, यक्षप्रश्न, श्रीकृष्णशिष्टाई यांची थोडक्यात माहिती दिली आहे.
रामायणात वाल्मीकऋषी, दिलीपराजा, रघुराजा, रामजन्म, रामास गुरुपदेश, यज्ञरक्षण, अहिल्योध्दार, सीतास्वयंवर, वनवास, मंदोदरी, मारुतीची भक्ती, युक्ती, शक्ती, विरक्ती यांच्या निवडक गोष्टी दिल्या आहेत.
महाभारतात भीमसेनाची दांडगाई, लाक्षागृह, बकासूरवध, द्रौपदी स्वयंवर, द्रौपदीला शिवाचा वर, पुण्याईचे जांभूळ, भीमभक्ती, अर्जुनास भक्तिचा गर्व, संन्याशी अर्जुन, मयसभा, जरासंध वध, राजसूय यज्ञ, द्रौपदी वस्त्रहरण, यक्षप्रश्न, श्रीकृष्णशिष्टाई यांची थोडक्यात माहिती दिली आहे.
सिद्धारूढ वैभव [कानडी मध्ये ही उपलब्ध ]: सिद्धारूढ वैभव हे नाव ठेवण्यात दोन अर्थ आहेत. एक हुबळी येथील परमहंस श्रीसिद्धारूढ महाराज यांचे चरित्र. दुसरा अर्थ सिद्धपदारूढ पुरुषांच्या ऐश्वर्याचे वर्णन, असा आहे. याचे सात भाग केले असून प्रत्येक भागाला “बेल” असे नाव दिले आहे. यात ठिकठिकाणी बोधवचने असून ती परमार्थ मार्गात; परमानंद-प्राप्तीच्या मार्गात पावलोपावली येणार्या अडचणी दूर करण्यास मार्गदर्शक अशी आहेत.
बोधामृत [कानडी मध्ये ही उपलब्ध ]: यात साधक व सिध्दांमधील प्रश्नोत्तरे, मुमुक्षोद्गार, साधकोद्गार, मनास बोध, गुरुशिष्यसंवाद, धर्माचे रहस्य, प्रार्थनेचे सामर्थ्य, नरदेहाचे महत्व, संतसंगती , संसाराची नश्वरता, एकादशी, तीर्थाटन, परमेश्वर, सद्-गुरुंची आवश्यकता, सद्-गुरुंचे सहाय्य, मार्गदर्शन, नाम, सेवा, गुरुबोध, साधकास सूचना, गुरुपौर्णिमा, सद्-गुरुंची बोधवचने, आनंदलहरी यांची विस्तृत माहिती असून साधकाने गुरुमार्गात कसे वागावे व परमेश्वराची भक्ती कशी करावी याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
श्रीकृष्णप्रताप : यामध्ये श्रीकृष्णाच्या जन्मापासून निजधामाला जाईपर्यंतच्या अनंत लीला असून त्यात सर्वत्र सुबोध भरलेला आहे. त्या वाचताना श्रीकृष्णाच्या लीला आपण प्रत्यक्ष पहातच आहोत की काय, असा भास होतो. यात आईंनी कृष्णावर प्रसंगानुरूप अतिशय सुंदर गौळणी लिहिलेल्या असून त्यांना सुंदर चालीही लावलेल्या आहेत.
श्रीमती एम्. विशालाक्षीलिखित
परमपूज्य आईंचे चरित्र :परमपूज्य माताजींच्या चरित्राचे पाच महत्त्वाचे कालखंड पाडता येतील.
१) त्यांचे बाळपण व त्याकाळची त्यांची साधना.
२) त्यांचा अल्पावधीचा पण नीटनेटका संसार.
३) वैराग्य व मठातील गुरुसेवा.
४) गुरुकृपा व त्यानंतरची गुरुसेवा.
५) श्रीहरिमंदिरात वास्तव्य व जगदोद्धाराचे कार्य.
ह्या प्रत्येक कालखंडापासून बद्धांना म्हणजे प्रापंचिकांना, मुमुक्षूंना म्हणजे मोक्षाची तीव्र तळमळ असणार्यांना, साधकांना म्हणजे मोक्षमार्ग आक्रमण करणार्यांना मार्गदर्शक अशा अनेक बोधपर गोष्टी आहेत.
माताजींचे चरित्र हे हिमालयाप्रमाणे उच्च कोटीतले असून लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच उत्तम मार्गदर्शक आहे. या चरित्रापासून आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांना प्रपंच व परमार्थाचे पायरीपायरीने शिक्षण मिळते. माताजींचे चरित्र गोष्टीरूपाने असल्यामुळे वाचीत असता जणू त्या गोष्टी प्रत्यक्ष आपण पहातच आहोत असा भास होतो.
माय जशी मुलाला समजेल अशा भाषेत बोलते, त्याप्रमाणे कठीण अध्यात्म विषय अगदी सोप्या भाषेत माताजी आपल्या सहज बोलण्याने आम्हाला पटण्यासारखे सांगत असल्याने चरित्र वाचता वाचता माताजींचे प्रत्येक वाक्य आमच्या हृदयाशी येऊन भिडते. त्यामुळे माताजींचे चरित्र आम्हा संसारिकांना जास्त उद्बोधक आहे.
माताजींचे चरित्र हे संसार अन् परमार्थ याचा परिपाक आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करावा याचा धडा आम्हाला माताजींच्या चरित्रापासून मिळतो.
१) त्यांचे बाळपण व त्याकाळची त्यांची साधना.
२) त्यांचा अल्पावधीचा पण नीटनेटका संसार.
३) वैराग्य व मठातील गुरुसेवा.
४) गुरुकृपा व त्यानंतरची गुरुसेवा.
५) श्रीहरिमंदिरात वास्तव्य व जगदोद्धाराचे कार्य.
ह्या प्रत्येक कालखंडापासून बद्धांना म्हणजे प्रापंचिकांना, मुमुक्षूंना म्हणजे मोक्षाची तीव्र तळमळ असणार्यांना, साधकांना म्हणजे मोक्षमार्ग आक्रमण करणार्यांना मार्गदर्शक अशा अनेक बोधपर गोष्टी आहेत.
माताजींचे चरित्र हे हिमालयाप्रमाणे उच्च कोटीतले असून लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच उत्तम मार्गदर्शक आहे. या चरित्रापासून आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांना प्रपंच व परमार्थाचे पायरीपायरीने शिक्षण मिळते. माताजींचे चरित्र गोष्टीरूपाने असल्यामुळे वाचीत असता जणू त्या गोष्टी प्रत्यक्ष आपण पहातच आहोत असा भास होतो.
माय जशी मुलाला समजेल अशा भाषेत बोलते, त्याप्रमाणे कठीण अध्यात्म विषय अगदी सोप्या भाषेत माताजी आपल्या सहज बोलण्याने आम्हाला पटण्यासारखे सांगत असल्याने चरित्र वाचता वाचता माताजींचे प्रत्येक वाक्य आमच्या हृदयाशी येऊन भिडते. त्यामुळे माताजींचे चरित्र आम्हा संसारिकांना जास्त उद्बोधक आहे.
माताजींचे चरित्र हे संसार अन् परमार्थ याचा परिपाक आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करावा याचा धडा आम्हाला माताजींच्या चरित्रापासून मिळतो.
गुरुमाय गुणगान : श्रीमती एम्. विशालाक्षी यांनी केलेले माताजींचे ओवीबद्ध गुणवर्णन गुरुमाय गुणगान या छोट्याश्या पुस्तकाच्या रूपाने छापलेले आहे. यामध्ये एकूण ३०८ ओव्या आहेत.
चरित्रामृतसार : परमपूज्य आईचे चरित्र संक्षिप्त स्वरूपात चरित्रामृतसार या पुस्तकात वर्णन केले आहे. तसेच आईंनी केलेली काही महत्वाची प्रवचने चरित्रामृतसार या पुस्तकात घातलेली आहेत.
सिद्धारूढ स्वामींचा आश्रय करून आईंनी सिद्धकला कशी हस्तगत केली याचेवर्णन चरित्रामृतसार या पुस्तकामध्ये केले आहे. ती सिद्धकला आईंनी चहूकडे पसरवून टाकली आहे. आईंनी प्राप्त केलेली सिद्धकला आम्हा सर्वांना प्राप्त व्हावी म्हणून आईंनी श्रीहरिमंदिराची स्थापना केली. या श्रीहरिमंदिराला पूर्वीच्या काळातील ‘गुरुकूल’ किंवा साधकांना आत्मज्ञान प्राप्त करून देणारे विद्यापीठ म्हणणे योग्य होईल. त्या सिद्धकलेच्या आधाराने आम्ही दुःखात बुडून न जाता संसारात तरंगत आहोत. आईच्या मांडीवरील मूल जसे आराम असते त्याप्रमाणे सिद्धकलेच्या कृपेने आम्ही आज सुखी जीवन जगत आहोत.
सिद्धारूढ स्वामींचा आश्रय करून आईंनी सिद्धकला कशी हस्तगत केली याचेवर्णन चरित्रामृतसार या पुस्तकामध्ये केले आहे. ती सिद्धकला आईंनी चहूकडे पसरवून टाकली आहे. आईंनी प्राप्त केलेली सिद्धकला आम्हा सर्वांना प्राप्त व्हावी म्हणून आईंनी श्रीहरिमंदिराची स्थापना केली. या श्रीहरिमंदिराला पूर्वीच्या काळातील ‘गुरुकूल’ किंवा साधकांना आत्मज्ञान प्राप्त करून देणारे विद्यापीठ म्हणणे योग्य होईल. त्या सिद्धकलेच्या आधाराने आम्ही दुःखात बुडून न जाता संसारात तरंगत आहोत. आईच्या मांडीवरील मूल जसे आराम असते त्याप्रमाणे सिद्धकलेच्या कृपेने आम्ही आज सुखी जीवन जगत आहोत.
इतर प्रकाशने
प्रवचन भाग १, भाग २, भाग ३ आणि भाग ४ : परमपूज्य आईंच्या हृदयखाणीतून निघालेली दुर्लभ अशी बोधरत्ने ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना लुटण्यासाठी त्यांच्याच कृपेने प्रवचनांच्या चारही भागामध्ये पुस्तकरूपात दिलेली आहेत.
या प्रवचनांच्याद्वारे आईंनी बाळगोपाळांना, संसारिकांना व पारमार्थिक वाटचाल करणाऱ्या साधकांना मार्गदर्शक अशा अनेक बोधपर गोष्टी संसारातील अनेक उदाहरणे देऊन पटवून सांगितलेली आहेत.
या प्रवचनांच्याद्वारे आईंनी बाळगोपाळांना, संसारिकांना व पारमार्थिक वाटचाल करणाऱ्या साधकांना मार्गदर्शक अशा अनेक बोधपर गोष्टी संसारातील अनेक उदाहरणे देऊन पटवून सांगितलेली आहेत.